Tuesday, May 20, 2014

आम आदमी पार्टीने 'जन आंदोलकांचा राष्ट्रीय संदर्भ' संपवीला -तरुण भारत

आम आदमी पार्टीने  'जन  आंदोलकांचा  राष्ट्रीय  संदर्भ'  संपवीला -तरुण भारत 
नागपूर  -२० मे २०१४

आम आदमी पार्टीने  या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व ४२६ जागांवर  उमेदवार उभे केले व  जनतेला एक पर्याय दिला होता. धर्म ,जाती ,गुंड माफिया व  भ्रष्ट पोटभरू नेत्यांना  आम्हीच एकमेव पर्याय आहोत असा दावा केला होता मात्र भारताच्या १२५ कोटी जनतेला पर्याय थोतांड वाटला असून त्यांनी तो नाकारला आहे हे आता समोर आले आहे मात्र आम आदमी पार्टीची हा दारूण पराजय चिंतेची वा चिंतनाची बाब नसून  आम आदमी पार्टीच्या अपरिपक्व नेतृवाखाली ३०० च्या वर भारतमध्ये व जगात 'जन अन्दोलनचा ' प्रतीक असलेले  सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संघटनांचे नेते 'सत्ता राजकारण विरहीत समाज परिवर्तनाचा आपला मंत्र ' सोडून निवडणुकीमध्ये उडी घेतली होती व त्यांचा दयनीय पराभव मात्र फार चिंतेचा विषय आहे कारण  भारतामधील 'जन आंदोलनाचे ' अस्तीव व संदर्भ धोक्यात आल्याची कडवी प्रतिक्रिया विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी आप पार्टीच्या दयनीय पराभवावर दिली आहे  
आप पार्टीच्या अपरिपक्व अती हुशार ,चतुर , विचार -धोरण विहीन असंतोषाच्या  लाटेवर कोणतीही तयारी न करता ४२६ जागी निवडणूकीला समोर जाणाऱ्या मुठभर प्रसिद्धी वेड्यांच्या सोबत तयारी न करता जाने चुकले  आहे कारण सर्वच आंदोलकांचा अनामती रकमा जप्त झाल्या असून २००च्या वर  मतदारसंघात  मतदारांनी नोटा वापर केला  मात्र यांना नाकारले आहे यावर खुली चर्चा करावी अशी मागणी सुद्धा तिवारी यांनी केली आहे 
महाराष्ट्राच्या आपच्या उमेदवारीचा हा आलेख (सोबत जोडला आहे) पाहीला  तर एक चटप साहेब जे आपचे नसून आयातीत उमेदवार होते  उरलेले सर्वांची अनामत रकम सरकार जमा झाली  आप पार्टीच्या स्टार प्रमुख नेते मयंक गांधी सारख्या  उमेदवारांचा खिमाच झाला मात्र आप नेत्याच्या मस्तीमुळे अनेक प्रमाणीक कार्यकत्यांना दयनीय पराभव सहन करावा लागला हे सत्य समोर आले आहे  यांनी अपक्ष म्हणून जास्त मते घेतली असती  बाब खरी असून मात्र त्यांनीसुद्धा  दिल्लीच्या  सोगांड्या नेत्याच्या टेली- वीसन (दृष्टी ) तमाशावर विश्वास ठेवला व  ते फसले हे आता सर्वच मान्य करीत आहेत 
महाराष्ट्रात फक्त शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार आमचे मित्र  श्री चटप साहेबांना  आपली अनामत वाचविता आली मात्र २००९ मध्ये सुध्यायांनी अपक्ष म्हणून जास्त मते घेतली  होती कारण 'कुणबी समाज ' व यावेळी माजी  खासदार नरेश पुगलीया यांचे बंड याचा  चटप यांना टोपीचे  सोंग घेऊनही झाला नाही ,अशी पुस्तीही तिवारी यांनी जोडली 

१९७७ सारखी बदलाची लाट आहे त्यावर बसून सत्ता लोकांसाठी वापरू हा अंदाच जन आंदोलकांचा चुकला याला आपची विकृत तानाशाही मंडळी ,त्यांचा अहंकार ,अती विश्वास ,सारे चोर हा युक्तिवाद कारणीभुत आहे  आता पराभवाचे थोतांड समर्थन करणे चुकीचे आहे  आता गरज आहे तर आत्म चिंतनाची व  आप पार्टीला रामराम ठोकण्याची ,असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे . 

No comments: